Mumbai Ilakhyatil Jati By Govind M Kalelkar

Mumbai Ilakhyatil Jati By Govind M Kalelkar

Regular price Rs. 300.00
Sale price Rs. 300.00 Regular price
'इंग्रजांच्या राजवटीत, तत्कालीन सरकारने 'गॅझेटियर' सारखे अनेक चांगले उपक्रम हाती घेतले होते. त्यातील एक उपक्रम 'जाती- जमातींची माहिती गोळा करण्याचा' होता. हे काम एन्थोवेन या इंग्रज अधिकाऱ्याने केले व सरकारने ते इंग्रजीत प्रसिद्ध केले. या इंग्रजी पुस्तकाचे नाव 'ट्राईब्ज अँड कास्ट्स ऑफ बॉम्बे ' असे होते. या पुस्तकाचा मराठी अनुवाद १९२८ मध्ये बडोदाहून 'श्री सयाजी ग्रंथमाला - क्रमांक २८' नुसार 'मुंबई इलाख्यातील जाती' या नावाने प्रसिद्ध केले. हे भाषांतर व लेखन 'गोविंद मंगेश कालेलकर' यांनी केले होते. या पुस्तकात एकंदर ४८३ जातींची माहिती दिली आहे. त्या काळच्या मुंबई प्रांतात गुजराती व कानडी मुलुखही असल्याने कानडी - गुजराती जातींचाही समावेश यात आहे. जातींची माहिती थोडक्यात दिली असली तरी, त्यात जमातींचे लग्नविधी, चालीरीती यांविषयी महत्त्वाची माहिती थोडक्यात दिली आहे. लग्नविधी बरोबरच अंत्यविधीचीही माहिती आहे.जुन्या काळी, जाती- जमातींची तपशीलवार माहिती गोळा करून दिल्यामुळे समाजशास्त्रच्या अभ्यासकांची मोठीच सोय झाली आहे. इतिहासकाळात रोटी- बेटी व्यवहार जातीबाहेर कधीही होत नसत त्यामुळे भारतीय समाज कप्पेबंद झाला होता. स्वांतत्र्यलढ्याच्या काळात, समाजसुधारकांच्या प्रयत्नामुळे भारतीय समाजात अभिसरण सुरु झाले ; आणि सर्व भारतीय समाज एकसंघ व संघटीत होणार अशी चिन्हे दिसू लागली. १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक राष्ट्र झाले व प्रौढ व्यक्तिच्या सार्वत्रिक मतदानावर आधारलेली निवडणूकप्रधान लोकशाही भारतात अस्तित्वात आली. निवडणुकांचा एक परिणाम असा झाला कि, 'जाती- जमातींचे महत्व कमी होण्याऐवजी जास्तच वाढले' राजकीय पुढाऱ्यांनाही जातीजमातींचा अभ्यास महत्वाचा वाटू लागला. भारतीय समाज जातीत विभागला गेला आहे; व या जातींचे अस्तित्व शेकडो नव्हे यापेक्षाही, जातींचा सखोल अभ्यास होईलच आणि सुरुवातीचा एक प्रयत्न
म्हणून या पुस्तकाचे महत्व अबाधित राहणारच आहे.