Balkumaransathi Valmiki Ramayan by Kedar Kelkar

Regular price Rs. 120.00
Sale price Rs. 120.00 Regular price

बालकुमारांसाठी वाल्मिकी रामायण

आपल्या देशात राजेशाही राजवट चालू असताना अनेक राजे आपली राज्ये भारतीय संस्कृती' युक्त धर्माच्या पायावर वर्षानुवर्षे सांभाळून आणि त्यामुळे ' कीर्तिवंत होऊन गेले ही आपली संस्कृती रामायण काळापासून प्रकर्षाने उजेडात आली ती ' प्रभू श्री रामचंद्र ' यांच्या संस्कृतीबद्ध अश्याच आचरणामुळे हे अगदी स्वच्छ आहे. आणि प्रभू श्री रामचंद्र यांचे चारित्र्य नजरेसमोर ठेवून ऋषी वाल्मिकी यांनी ' रामायणा' ची रचना केली. आपल्या देशातले मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यासह सर्व जगप्रसिध्द राजे आपल्या बालपणात रामायण आणि त्यानंतर घडलेल्या महाभारत ह्या दोन्ही ' भारतीय संस्कृतीने' ओतप्रोत भरलेल्या ग्रंथातील सर्व कथा आपल्या पालक आणि गुरू यांच्या मुखातून ऐकून आणि पुढे स्वतः वाचन-मनन करूनच आपला राज्यकारभार चालवून जगप्रसिध्द होऊन गेले....

आपल्या आजच्या नव्या पिढीतील बाल - शिशु - कुमार युवक अश्या सर्वच संस्कारक्षम गटातील मुला मुलींना डोळ्यापुढे ठेवून ह्या पुस्तकाचे लेखन केले असून ' वाल्मिकी रामायणाचे ' मूळ मराठी ग्रंथ वाचणे जड जातील आणि, ' रामायण कसे घडले' यांसह त्यातली व्यक्तिमत्वे कळण्यासाठी फार लांबण न लावता ह्यातील कथा थोडक्यात लिहिल्या आहेत अश्यावेळी, मोठ्या हिंदी आणि मराठी ग्रंथांचाही आधार घेतला आहे, त्यामुळे ह्या कथा सर्वांना भावतील अशी आशा आहे.

- केदार केळकर- पुणे 4